प्रचार प्रसिद्धीच्या या युगात जग अगदी लहान झाले आहे. जगाच्या कानाकोपर्यात घडणारी कोणतीही गोष्ट तत्काळ या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वांपर्यंत पोचते असे म्हणतात. या विधानातले तथ्य एवढेच की, प्रचार माध्यमे अधिक शक्तिशाली झाली आहेत व रात्रंदिवस माहिती ऐकविण्याची त्यांची क्षमता अपरिमीत वाढली आहे. पण साधन हे कधीच चांगले अथवा वाईट नसते. ते वापरणार्यांच्या बुद्धीवर त्याचा चांगले वाईटपणा अवलंबून असतो. प्रसिद्धी माध्यमे आज सर्वसामान्य व्यक्तीचे प्रबोधन करणे, संस्कार करणे, जगात कुठे काय चांगले चालले आहे ते इतरांपर्यंत पोचवतो या भूमिकेपासून फार दूर आहेत. या वार्तांकनाचे विश्लेषण समीक्षा कशी करावी हे समजावून देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे अशा पद्धतीच्या विश्लेषणातून एकांगी बातम्यांमुळे होणारा सामान्य माणसाच्या मनातील गोंधळ कमी होईल अशी आशा वाटते.