माणसाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या अनाकलनीय व्यापारामध्ये समाज आणि संस्कृती यांचे स्थान काय? तर हे नाते अतूट असले तरी कुठे सुस्पष्ट तर कुठे धूसर असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीचे विशुद्ध स्वरुप कोणत्या प्रकारचे आहे हे स्पष्ट करण्यासाठी लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे. यात महाभारत कर्णपर्व, भगवत्गीता यांचेही संदर्भ जागोजागी आढळतात. तसेच मृत्यू, मुल्य, संस्कृती, वेदवाङ्मय प्राचीन वाङ्मय इ. अनेक गोष्टींबद्दल उहापोह केला आहे.