साऱ्या मानवतेची संपूर्ण कहाणी आपल्यात सामावलेली असते. मानवाने युगानयुगे गोळा केलेले अफाट अनुभव, खोलवर रुजणारी भीती, चिंता, दुःख , साऱ्या समजुती , म्हणजे तुम्ही एक असे पुस्तक आहात जिथे त्या पुस्तकांचे वाचन करणे हि देखील एक कलाच आहे . हे विधान जे. कृष्णमूर्तींनी त्यांच्या श्रीलंकेतील भाषणांत केले आहे. कुठल्याही प्राचीन पवित्र ग्रंथांचा किंवा तत्व प्रणालींचा अभ्यास करण्यापेक्षा मानवाने स्वतःचे जीवन पुस्तक वाचणे आणि त्यातील वेगवगेळ्या प्रकरणांचा अभ्यास करून जीवन समृद्ध करणे खूप गरजेचे आहे. असे त्यांचे स्पष्ट मत आहे. जे. कृष्णमूर्ती लिखित मराठी कादंबरी "श्रीलंकेतील भाषणे" अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात.