असं म्हणतात की आजपासून २४०० वर्षांपूर्वी भारतात एका अजरामर अशा ग्रंथाची निर्मिती झाली. जो ग्रंथ पृथ्वीच्या अंतापर्यंत मानवजातीला आवश्यक असणार होता. या ग्रंथाचे नाव कामसूत्र! हा ग्रंथ प्रत्येक भाषेत पुढे अनुवादीत केला गेला. जगभरात सर्वाधिक विक्रीचा ग्रंथ म्हणूनही हा ओळखला जातो. सुरूवातीची काही वर्षे तर अनेक देशांमध्ये या ग्रंथावर बंदी घातली गेली होती. मात्र पुढे ब्रिटीश सैनिक असलेला सर रिचर्ड बर्टन याने मूळ संस्कृत असलेल्या या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले तेव्हा त्याने म्हटले की कामसूत्र या भारतीय ग्रंथाने प्रेम कसे करावे याची शिकवण देऊन जगावर उपकारच केले आहेत.