उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे? त्याने आपल्या भागात कामं केलीयेत का? त्याची ताकद किती, वगैरे वगैरे... पण त्याच्यावर काही गुन्हा वगैरे दाखल आहे की नाही, हे जाणून घेण्याचे कष्ट आपण खचितच घेत नाही, बरोबर ना? भारताच्या संसदेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभेत यामुळेच गुन्हे दाखल असलेल्या खासदार, आमदारांची संख्या भरपूर आहे. याचा नक्की आपल्या लोकशाहीवर काय फरक पडतो? जरा खोलात जाऊन जाणून घेऊया...