Descriptionरामराज्याची भुरळ आजही कमी झालेली नाही. पण होते कसे ही रामराज्य? प्रजा नेमकी कसे जगत होती? त्यांच्या जीवनसंघर्षाची तीव्रता काय होती? त्यांची नितीमुल्ये, जीवनधारणा आणि स्वप्ने नेमकी काय होती? राम जगातील आदर्श राजा मानला जावा असे काय वेगळे होत होते रामराज्यात? इंद्रालाही आपले पद जाईल अशी धास्ती का वाटली? राम अयोध्येला येणार त्या दिवशी सकाळपासून ते राम प्रत्यक्षात अयोध्येला पोहोचेपर्यंतच्या काळात रामराज्यातील अयोध्येत राहणारी ते वस्त्या-गावात राहणा-या निवडक व्यक्तींच्या आयुष्यात काय घटना घडल्या आणि त्यांची नैतिक दृष्टी काय होती याचे हृदयंगम दर्शन घडवणा-या या कथा रामराज्याचे महनीय आणि उदात्त रूप वाचकांसमोर ठेवत स्वप्न देते कि आजही तसेच राज्य असले पाहिजे...रामराज्य! संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या या कथा ऐका यशश्री यांच्या हृदयाला भिडणा-या आवाजात!