"गंगा मेरे लिए निशानी है भारत की प्राचीनता की, संस्कृती की, जो बहती आई है वर्तमान तक और बहती चली जा रही है भविष्य के महासागर की ओर.." भारताचे पहिले पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मृत्युपत्रात गंगा नदीबद्दल लिहिलेल्या या ओळी... भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात गंगा नदीचा गर्भश्रीमंत वारसा किती महत्त्वाचा आहे, हे या ओळींवरून लक्षात येतं. गंगेजवळ असं काय आहे की ती भारतीयांसाठी एवढी जिव्हाळ्याची नदी आहे? गंगेचा आणि भारताच्या राजकारणाचा काय संबंध आहे? चला, जाणून घेऊया...