हत्ती गेला अन् शेपूट राहिले ही म्हण प्रत्येकाने ऐकली असेलच. एलआयसीच्या बाबतीतदेखील ही म्हण लागू होईल, मात्र उलट अर्थाने! म्हणजेच शेपूट गेली अन् हत्ती राहिला! भांडवली बाजारात बहुप्रतिक्षित अशा आयुर्विमा महामंडळाच्या समभाग विक्रीकडे भारतासह जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलंय. एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या यशस्वितेसाठी केंद्र सरकारचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्यावेळी आयपीओ बाजारात धडकेल त्यावेळी भांडवली बाजारातील परिस्थितीदेखील आयपीओवर परिणाम करेल. त्याचा एकूणच पॉलिसीधारकांवर, गुंतवणुकदारांवर, शेअर बाजारावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला-वाईट कसा परिणाम होईल ते बघूया.