कॉर्पोरेट कंपनीने बँकेचं कर्ज बुडवल्यामुळे बँक दिवाळखोरीत!' किंवा 'कुणी मोठा उद्योजक बँकेचे कर्ज घेऊन परदेशात पळून गेला' अशा मथळ्याखाली छापल्या जाणाऱ्या बातम्या अनेकदा तुमच्या पाहण्यात आल्या असतील. अशा कंपन्या किंवा उद्योगपतींवर गुन्हे दाखल होतात, त्यांच्यावर कारवाई केली जाते हे आपल्याला ज्ञात आहे, पण कर्ज बुडीत खाती गेल्यानंतर बँकेचं काय होत असेल? कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेली कर्जे परत न मिळालेल्या अनेक बँका भारतात आहेत. या सगळ्या बँकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि भारताची बँकिंग व्यवस्था वाचवण्यासाठी सरकारने एक युक्ती शोधून काढलीय! काय आहे ही युक्ती? जाणून घेऊया...