भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय उद्योगजगात २०९० ते २०२० हे दशक माहितीयुगाचा सुवर्णकाळ म्हणता येईल. इंटरनेट, क्लाऊड आदी तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे मानवी जीवनातील विविध वस्तू आणि सेवा पोहचवण्यासाठी ॲप्लिकेशन्स निर्मितीची लाटच आली आणि त्यातून शेकडो नवकल्पना निर्माण होऊ लागल्या या कल्पना घेऊन येणा-या युवकांना गुंतवणूक निधी मिळू लागला व त्यातून स्टार्टअप उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. म्हणूनच गेले दशक हे ख-या अर्थाने उद्योजक निर्मितीचे होते का हे जाणून घेऊया प्रसिध्द उद्योजक आनंद देशपांडे यांच्याकडून...!