कोरोना महामारी आली आणि अचानक ऑनलाईन शिक्षणाचं मोठं आव्हान मुलं, पालक आणि शाळांच्या समोर उभं राहिलं. तोवर ऑनलाईन शिक्षणाचा विचार कुणीच गांभीर्याने केलेला नव्हता. अशावेळी महानगरांपासून गाव खेड्यापर्यंत मुलांनी ऑनलाईन शिक्षण कसं घेतलं? काय अडचणी आल्या? हातात सतत मोबाईल असणं इथपासून ते ऑनलाईन शिक्षणासाठी गॅजेट्स नसणं, कनेक्टिव्हीटी नसणं या सगळ्याचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो आहे? शिक्षणाची मानसिकता, ऑनलाईन शिकवण्यासाठी आवश्यक असलेली स्किल्स त्यांच्याकडे आहेत का? त्याचबरोबर शाळांनी काय अभिनव पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देऊ केले, येत्या काळात ऑनलाईन शिक्षण आणि मुलं या समीकरणाकडे कसं बघायला हवं? या अतिशय कळीच्या विषयावर शिक्षक, स्तंभ लेखक आणि अभ्यासक भाऊसाहेब चासकर यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी साधलेला विशेष संवाद !