मराठी मनांवर शिवरायांचं आणि त्यांच्या दख्खनच्या भूमीचं मोठं गारुड आहे. इस्लामी राजवटीखाली पिचलेल्या मराठी मनगटांना बळ देणाऱ्या मराठ्यांचा पराक्रम याच मातीत उगवला, रुजला आणि बहरला. जी हजारोंच्या फौजांना जिंकता आली नाही, भल्याभल्या सेनानींचे भाले जिच्या समोर बोथट झाले. ती जमीन वर्षोनुवर्षे अशीच आहे का? शिवरायांच्या आधी तिथं कुणीकुणी राज्य केली?